⁠  ⁠

भारताचा सलग आठवा मालिका विजय

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 1 Min Read
1 Min Read

भारताने रविवारी निर्णायक वनडेत श्रीलंकेवर आठ विकेटनी विजय मिळवला. ही वनडे जिंकून बदली कर्णधार रोहित शर्माच्या टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली.

भारताचा हा सलग आठवा मालिका विजय ठरला. वनडेमध्ये भारताने सलग आठवा मालिका विजय नोंदविला. जून २०१६मध्ये भारताने झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० जिंकली होती. त्यानंतर भारताने ऑक्टोबर २०१६मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३-२, जानेवारी २०१७मध्ये इंग्लंडविरुद्ध २-१, जून-जुलै २०१७मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३-१ असा विजय नोंदविला होता. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत भारताने ५-० मालिका विजय नोंदविला होता. या यशानंतर मायदेशात भारताने ऑस्ट्रेलियाला ४-१, तर न्यूझीलंडला २-१अशी धूळ चारली. आता श्रीलंकेवर २-१ अशी बाजी मारली.

Share This Article